Friday, August 26, 2011
आयुष्य अगदी ....
मैत्री म्हणजे
श्रावणात असलेला उन पावसाचा खेळ
आणि आकाशी वसलेला इंद्रधनुषी मेळ
दोन जिवांतील अनामिक ओढ
प्रसंगी तुरट पण तरीही अवीट गोड
डगमगत्या पावलांना जशी धीराची साथ
आणि कधीही घातलेली हक्काची साद
जसा मायेने भारावलेला घासभर भात
आणि हलकेच पाठीवर ठेवलेला हात
अशीच राहुदे मैत्री जन्मभर
जसा वणवणता प्रवास आणि विश्रांती क्षणभर
Saturday, August 13, 2011
खरच का नियती इतकी निष्टुर असते ?
खरच का नियती इतकी निष्टुर असते ?
येणाऱ्या प्रत्येक जीवाला
हातच्या खेळण्या सारख खेळवते
सर्व दोर हाती धरून
कठपुतली सारख नाचवते
खरच का नियती इतकी निष्टुर असते ?
चेहऱ्यावरच हसू
किती कठोरतेने पुसते
डोळ्यातलं पाणी पाहून
निर्दयतेने हसते
खरच का नियती इतकी निष्टुर असते ?
गेल्याजन्मीच्या पाप पुण्याचे हिशेब
या जन्मी मांडते
आणि खरोखरीच निष्पाप जीवांवर
जीवघेणे आघात करते
खरच का नियती इतकी निष्टुर असते ?
दोन क्षणात
होत्याच नव्हत करते
पाहता पाहता
उभ्या जीवनच मातेर करते
खरच का नियती इतकी निष्टुर असते ?
पण हळूच कधी कधी
ओंजळी भर भरून सुख देते
दुखालेल्या जीवाला
मायेची उब देते
खरच ही नियती इतकी का निष्टुर असते ?