कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.
Showing posts with label भावना. Show all posts
Showing posts with label भावना. Show all posts

Thursday, August 21, 2014

न बोलता येणारं दुःख म्हणजे मनाला लागलेली वाळवी ...

Monday, July 28, 2014

ओरखडा


नुसत्या विसर म्हटल्याने विसरता येतात काही गोष्टी?

आयुष्याच्या काळ्या पाटीवर पांढर्या खडूने बरच काही लिहील जातं. कधी कधी पाटी पुसायची वेळ येते तेव्हा लिहिलेलं पुसताही येत, अगदीच नाही जमल तर ओल्या कापडाने पुसायच. 

पण काही गोष्टी पाटीवर अगदी ओरखड्यासारख्या उमटून गेल्या असतील तर? तो ‘ओरखडा’ कसा पुसायचा? 

पाटी काळी होते पुन्हा पण नवी कोरी होत नाही
आयुष्याची गोष्ट आता तुझ्याशिवाय पुरी होत नाही

Friday, July 20, 2012

तुझ्याकरता जरी एका, क्षणापुरत असण होत
माझ्याकरता मात्र त्या, क्षणात सार जगण होत

खुळ होत मन माझ, खुळ त्याच वागण होत 
येणार नाहीस परत तरीही, तुझी वाट पाहण होत

वरून पाहता सार कस, शांत शांत होत कारण
मनामध्ये उठणार ते, वादळ फार शहाण होत

पुढे चालत राहण होता, प्राक्तनाचा भाग जरी
तरीदेखील वळणांवरती, उरून मागे राहण होत

आयुष्यात सोबतीला, सारच काही होत तरीही
सरतेशेवटी मात्र माझ, एकट एकटच राहण होत

-जीवा


Wednesday, February 1, 2012

स्वप्नांच गाव

का जुन्या स्वप्नांचा हात सोडून
आपण पुढे निघून जातो
आपण पुढे जातो
स्वप्नांचा गाव मागे राहतो
मग कधीतरी आपणच सजवलेल्या
त्य गावात आपण पुन्हा पाय ठेवतो
पण आपलाच तो गाव
आपल्याला परका वाटू लागतो
आपणच सजवलेला तो एक एक खेळ
मग लहानग्यांच्या भातुकलीच्या खेळा इतका
खुळा वाटू लागतो
पण तरीही क्षणभर का होईना
तो खेळ पुन्हा जगवा वाटतो
पण काही केल्या त्या जुन्या खेळात
आता गुंतता येत नाही
पुन्हा जुन्या स्वप्नांत आता हरवता येत नाही
मग वाटत
हीच का ती स्वप्न ज्यात आपण हरवलो होतो
त्याच का त्या स्वप्नासोबत
आपण क्षण अन क्षण जगलो होतो
विश्वास ठेवण तस जरा कठीणच होत
पण याही प्रश्नच उत्तर आपल्याकडेच असत
जुन्या त्या स्वप्नांची जागा
आपल्याच नव्या स्वप्नांनी घेतलेली असते
आणि आपणच नकळत आपल्या
जुन्या सोबत्यांची सोबत सोडलेली असते
म्हणूनच
आपल्याच जुन्या स्वप्नांचा गाव
आपल्यासाठी परका असतो
आणि आपल्याच त्या गावात
आपला मार्ग हरवलेला असतो

-जीवनिका

Sunday, December 4, 2011

लहानपणी जेव्हा मुल रडत
तेव्हा त्याला शांत करण्यासाठी आई
त्याच लक्ष इकडे तिकडे वेधते.
मोठेपणीही काहीस तसच असत. आपल्या दुःखावर
फुंकर मारण्याचा प्रयत्न आपली लोक करतात.
खरतर लहानपणी आणि मोठेपणी बऱ्याच गोष्टी, भावना तशाच राहतात
फक्त त्याच स्वरूप बदललेलं असत
बाळबोधपणाकरून शहाणपणाकडे वळलेल असत ...

Thursday, December 1, 2011

खांदा

माणसाला खांद्याची गरज काय
फक्त हे जग सोडून जातानाच असते?
खरी गरज तर
या जगातले घाव झेलल्यावर असते.
पण हे कुठे कोणाला कळतय
जिवंत माणसाला आधाराला एक खांदा मिळत नाही
आणि मेल्यावर चार चार मिळतात.
हा कुठला न्याय? हि कुठली रीत?

Monday, October 31, 2011

क्षण आणि आठवणी

क्षणांच्या आठवणी होतात आणि क्षण परके होतात
पण आठवणी कधीच परक्या होत नाहीत
क्षण जाताना आयुष्य घेऊन जातात
पण आठवणी जगताना नेहमी सोबत करतात
पण कधी कधी आठवणी सुद्धा त्रास देतात
जसे जुन्या जखमांचे व्रण नव्याने जखमा देतात
पण त्यावर फुंकर घालायला पुन्हा आठवणीच येतात
आठवणी आणि क्षण वेगळे नसतात
कारण क्षणांच्याच नंतर आठवणी होतात
म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण असा सांभाळावा
कि त्या क्षणांच्या चांगल्या आठवणी होतील
आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला नवा रंग देऊन जातील

http://deepjyoti2011.blogspot.com/2011/09/blog-post_8236.html