कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.
Showing posts with label सहज सुचलेले. Show all posts
Showing posts with label सहज सुचलेले. Show all posts

Thursday, August 21, 2014

न बोलता येणारं दुःख म्हणजे मनाला लागलेली वाळवी ...

Monday, July 28, 2014

ओरखडा


नुसत्या विसर म्हटल्याने विसरता येतात काही गोष्टी?

आयुष्याच्या काळ्या पाटीवर पांढर्या खडूने बरच काही लिहील जातं. कधी कधी पाटी पुसायची वेळ येते तेव्हा लिहिलेलं पुसताही येत, अगदीच नाही जमल तर ओल्या कापडाने पुसायच. 

पण काही गोष्टी पाटीवर अगदी ओरखड्यासारख्या उमटून गेल्या असतील तर? तो ‘ओरखडा’ कसा पुसायचा? 

पाटी काळी होते पुन्हा पण नवी कोरी होत नाही
आयुष्याची गोष्ट आता तुझ्याशिवाय पुरी होत नाही

Friday, July 20, 2012

तुझ्याकरता जरी एका, क्षणापुरत असण होत
माझ्याकरता मात्र त्या, क्षणात सार जगण होत

खुळ होत मन माझ, खुळ त्याच वागण होत 
येणार नाहीस परत तरीही, तुझी वाट पाहण होत

वरून पाहता सार कस, शांत शांत होत कारण
मनामध्ये उठणार ते, वादळ फार शहाण होत

पुढे चालत राहण होता, प्राक्तनाचा भाग जरी
तरीदेखील वळणांवरती, उरून मागे राहण होत

आयुष्यात सोबतीला, सारच काही होत तरीही
सरतेशेवटी मात्र माझ, एकट एकटच राहण होत

-जीवा


Tuesday, May 22, 2012

खेळ

चालता चालता सहज दोन माणस भेटतात
आपापली खेळणी घेऊन नवा खेळ मांडतात
चार आसपासची लोकं त्यात हातभार लावतात
खेळ रंगतो ही चांगला
खुलतो ही चांगला
कधी कुणी जिंकत
कधी कुणी हरत
कुणी चीडीचा डावही खेळत
पण  खेळताना एकमेकांना
सावरूनही घ्यायचं असत हे ही कळत जात
नकळतच जीवाच जीवावाचून अडत जात
पण अचानकच नियतीचा डाव येतो
या तिसऱ्या गड्याला प्रत्येकजण विसरूनच गेलेला असतो
पण ती पासे फेकणे विसरत नाही, फेकतेच
कधी  पासे आपल्या बाजूने पडतात
आणि खेळ शेवटपर्यंत चालू राहतो
पण कधी पासे तिच्याबाजुने पडतात
आणि खेळ तिथेच संपतो
जाता जाता एक मात्र साक्षात्कार होतो
खेळ खेळासारखाच खेळायचा
अकारण त्यात जीव नाही गुंतवायचा
कारण...
जसा पायात पाय अडकून तोल जातो
तसा जीवात जीव अडकून जीव जायचा
मग मांडलेला तो पसारा
कुणी बर आवरायचा
दुसर कुणी येऊन त्यात नवा खेळ मांडला तर
तो ही खेळ असाच मोडायचा

- जीवनिका





Thursday, February 23, 2012

लाटा आणि भावना
यात काय फरक आहे
सागरात जशा लाटा
एकापाठोपाठ एक येताच असतात
तशा मनाच्या सागरात
भावना येत जातात
कधी हलक्या कधी मोठ्या
एका लाटे पासून दुसरी लाट
वेगळी करता येणार नाही
तसच एका भावनेपासून दुसरी भावना
वेगळी करता येण शक्य नाही
आयुष्याचा मार्ग हा असा एकच मार्ग आहे
ज्यावर चालत असताना माणसाला शेवट नको असतो.
हा मार्ग कधी संपूच नये अस वाटत.
या मार्गावर चालताना माणूस थकत नाही.
या शर्यतीत कधी कोणाला जिंकावस वाटत नाही.

Monday, December 5, 2011

प्रकाशात उजळलेल्या घराकडे पाहिलं जात
प्रकाशाच्या कारणाकडे नाही
कारण प्रकाशाच्या कारणाकडे पहिल्याने
डोळे दिपतात. मानवी डोळ्यांची ते सहन करण्याची क्षमता नाही.
एखाद्या गोष्टीला चांगल्या दृष्टीने पाहिलं
म्हणजे उंची वाढते
त्या गोष्टीचीही आणि आपलीही.

Sunday, December 4, 2011

लहानपणी जेव्हा मुल रडत
तेव्हा त्याला शांत करण्यासाठी आई
त्याच लक्ष इकडे तिकडे वेधते.
मोठेपणीही काहीस तसच असत. आपल्या दुःखावर
फुंकर मारण्याचा प्रयत्न आपली लोक करतात.
खरतर लहानपणी आणि मोठेपणी बऱ्याच गोष्टी, भावना तशाच राहतात
फक्त त्याच स्वरूप बदललेलं असत
बाळबोधपणाकरून शहाणपणाकडे वळलेल असत ...

Saturday, December 3, 2011

स्वप्न प्रत्येकानेच पहावीत
तो अधिकार प्रत्येकालाच आहे
पणप्रत्येक स्वप्न पूर्ण झालच पाहिजे
असा अट्टाहास नको
कारण स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत
पण काही स्वप्न पूर्ण करायची म्हणजे
काहीतरी मोजाव लागत
स्वप्न पाहणार्यालाही आणि
ती पूर्ण करणाऱ्यालाही

Thursday, December 1, 2011

खांदा

माणसाला खांद्याची गरज काय
फक्त हे जग सोडून जातानाच असते?
खरी गरज तर
या जगातले घाव झेलल्यावर असते.
पण हे कुठे कोणाला कळतय
जिवंत माणसाला आधाराला एक खांदा मिळत नाही
आणि मेल्यावर चार चार मिळतात.
हा कुठला न्याय? हि कुठली रीत?