कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Saturday, August 24, 2013

आयुष्य अगदी …

मला वाटतं,
आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.
जगात पहिल्यांदा डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडतं जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात
आयुष्य सरत असतं…
काही पानं दुमडली जातात, परत कधीही न उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात…
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलं असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं.
 -जीवा

Sunday, August 18, 2013

चेहरा


जगात प्रत्येक जण रंग भूमीवरच पात्र रंगवत असतो
पण त्या पलीकडला खरा माणूस कुठे दिसतो?
तो चेहरा नेहमी लपलेला असतो
जो समाजाच्या चौकटींत बसतो
तोच मुखवटा प्रत्येकजण ओढतो
कालांतराने मुखवटा बदलतो
पण खरा चेहरा लपूनच राहतो
पण कधीतरी एखादा क्षण येतो
आणि चेहरा उघडा पडतो
दोन मुखवट्यांच्या अदलाबदलीच्या
दरम्यान घात होतो
काही काळापुरताच का होईना
खरा चेहरा समोर येतो
पण समोरचा त्यावेळी
पाहणारा असावा लागतो
पण दैव दुर्विलास असा
कि समोरचा आपल्या मुखवट्यांच्या
अदलाबदलीच्या खेळत अडकलेला असतो
कारण त्यालादेखील आपला खेळ चांगला रंगवायचा असतो
म्हणून तो खरा चेहरा पाहण्याची संधी मुकतो
आणि खरा चेहरा नेहमी पडद्याआडच राहतो
-जीवनिका

स्वप्नांच गाव

का जुन्या स्वप्नांचा हात सोडून
आपण पुढे निघून जातो
आपण पुढे जातो
स्वप्नांचा गाव मागे राहतो
मग कधीतरी आपणच सजवलेल्या
त्य गावात आपण पुन्हा पाय ठेवतो
पण आपलाच तो गाव
आपल्याला परका वाटू लागतो
आपणच सजवलेला तो एक एक खेळ
मग लहानग्यांच्या भातुकलीच्या खेळा इतका
खुळा वाटू लागतो
पण तरीही क्षणभर का होईना
तो खेळ पुन्हा जगवा वाटतो
पण काही केल्या त्या जुन्या खेळात
आता गुंतता येत नाही
पुन्हा जुन्या स्वप्नांत आता हरवता येत नाही
मग वाटत
हीच का ती स्वप्न ज्यात आपण हरवलो होतो
त्याच का त्या स्वप्नासोबत
आपण क्षण अन क्षण जगलो होतो
विश्वास ठेवण तस जरा कठीणच होत
पण याही प्रश्नच उत्तर आपल्याकडेच असत
जुन्या त्या स्वप्नांची जागा
आपल्याच नव्या स्वप्नांनी घेतलेली असते
आणि आपणच नकळत आपल्या
जुन्या सोबत्यांची सोबत सोडलेली असते
म्हणूनच
आपल्याच जुन्या स्वप्नांचा गाव
आपल्यासाठी परका असतो
आणि आपल्याच त्या गावात
आपला मार्ग हरवलेला असतो

-जीवनिका


मना सांग रे ...


मना सांग रे
तुला मी कसे ओळखावे

कधी वाटतो तू वसंतापरी अन्
कधी हा असा सावळा रंगलेला

कधी होतसे मंद झुळूकेपरी तू
कधी का असे तू दिशाहीन वारा

कधी घेतसे झेप प्रकाशाकडे अन्
कधी का असे अंधार तुला भावलेला

मना सांग रे
नेहमी हे असेच का व्हावे
तुझ्यासवे नेहमीच का मी झुलावे
आधी फुलावे अन् मग कोमेजून जावे
मना सांग रे

-जीवनिका
तुटला, तुटलाच म्हणताना
का पुन्हा जोडला जातो धागा
मोडून पडता पडता पुन्हा
कसा उभा राहतो बांध
का ओळख विसरता विसरता,
पुसट होता होता
पुन्हा गडद होतो चेहरा
कधी नव्हतच की काय इथे काही
असं वाटायला लागतं असताना
का पुन्हा तयार व्हायला लागतं चित्र
आहे म्हणाव की नाही म्हणाव
की नुसत्या असण्या नसण्यात
झुलत राहव तेच कळत नाही
असण्या नसण्यात फार वाद होतो हल्ली

Wednesday, October 10, 2012

जगासाठी वार्यावरती, भिरभिरणारं पान जरी
माझ्यासाठी मात्र बेधुंद, जगणं त्याच छान होतं

-जीवा
काही ढगांना गरजत बरसणं ही जमतं
काहींना मात्र साधी रिपरिपही जमत नाही
-Jiva

Saturday, September 22, 2012

बांडगुळ

नकोय मला आधार
आधार मिळाला ना की बांडगुळ व्हायला होतं
आधाराला जखडून जायला होतं
प्रत्येक नवी पालवी फुटण्याआधी
आधाराकडे आशेने पहावं लागतं
नाही व्हायचय मला बांडगुळ
आणि तुझाही आधार वृक्ष होऊ द्यायचा नाहीये
नाही तर आधार देता देता
आधार वृक्षच कोलमडून पडायचा
मग त्यावर जगणारं बांडगुळ तरी
कसं उभं राहणार
म्हणून
नाही व्हायचय मला बांडगुळ
आणि तुझाही आधार वृक्ष होऊ द्यायचा नाहीये
तुला बहरताना पहायचय
आणि माझा आधार मात्र मलाच व्हायचय

-जीवा


Sunday, September 9, 2012

व्यर्थच

जगण्याचा अर्थ शोधता, मरणाचे ते भय ठरले
मरणाचा अर्थ उमगता, जगणे ते व्यर्थच ठरले

नसण्यासम असणे होते, क्षणभर ते जगणे होते
जगण्याचा अर्थ हरवता, असणे ते व्यर्थच ठरले

काळासव घडले काही, जगण्यातून कळले काही
पण सारे अर्थ हरवले, कळणे ते व्यर्थच ठरले

- जीवा

गझल  लिहिण्याचा प्रयत्न केला होता पण जमला नाही.

Tuesday, July 24, 2012

चल थोडे थोडे भांडून घेऊ
चल थोडे थोडे रुसून घेऊ
या थोडया भांडण्यात
या थोडया रुसण्यात
चल थोडे थोडे हसून घेऊ
चल थोडा थोडा अबोला करू
चल थोडा थोडा फुगवा धरू
या थोडया अबोल्यात
या थोडया फुगण्यात
चल  थोडे थोडे बोलून घेऊ
या भांडण्याची दगदग फार
या रुसण्या फुगण्याचे श्रम फार
या श्रमण्या दमण्याच्या दगदगीतून
विश्रांतीचा एक क्षण चोरून घेऊ
चल, जाऊया कुठेतरी
एका शांत निवांत जागी थोडे बसून घेऊ
थोडे  हसून घेऊ
थोडे बोलून घेऊ
तुझ्या माझ्या असणाऱ्या या क्षणात
थोडे थोडे जगून घेऊ
पुन्हा सुरु होईलच पाठशिवणीचा खेळ
थोडा अबोला रुसवा फुगवा साऱ्याचीच भेळ
आपण पुढेच चालत राहू
जगणे कुठेतरी मागेच सुटेल
म्हणून  थांब...
मला  एक वचन दे
तू येशील इथेच असाच एक क्षण चोरून
आपण असेच भेटत राहू
थोडे हसत राहू
थोडे बोलत राहू
तुझ्या माझ्या क्षणांमध्ये
थोडे थोडे जगत राहू

- जीवा

तू मला तुझ आकाश दे
मी तुला माझ आकाश देईन
तू  माझा तारा हो
मी  तुझा तारा होईन
तू मला दिशा दाखव
मी तुझा मार्ग पाहीन
तुझ्या  आकाशात मी
माझे धृवपद मिरवीन
आपल्या  या जगात आपण
आपलेआपलेच राहू
आपल्या आपल्या नभात
आपण आपलेच तारे पाहू
आपण आपले आपलेच राहू

-जीवा

Friday, July 20, 2012

तुझ्याकरता जरी एका, क्षणापुरत असण होत
माझ्याकरता मात्र त्या, क्षणात सार जगण होत

खुळ होत मन माझ, खुळ त्याच वागण होत 
येणार नाहीस परत तरीही, तुझी वाट पाहण होत

वरून पाहता सार कस, शांत शांत होत कारण
मनामध्ये उठणार ते, वादळ फार शहाण होत

पुढे चालत राहण होता, प्राक्तनाचा भाग जरी
तरीदेखील वळणांवरती, उरून मागे राहण होत

आयुष्यात सोबतीला, सारच काही होत तरीही
सरतेशेवटी मात्र माझ, एकट एकटच राहण होत

-जीवा


Tuesday, May 22, 2012

खेळ

चालता चालता सहज दोन माणस भेटतात
आपापली खेळणी घेऊन नवा खेळ मांडतात
चार आसपासची लोकं त्यात हातभार लावतात
खेळ रंगतो ही चांगला
खुलतो ही चांगला
कधी कुणी जिंकत
कधी कुणी हरत
कुणी चीडीचा डावही खेळत
पण  खेळताना एकमेकांना
सावरूनही घ्यायचं असत हे ही कळत जात
नकळतच जीवाच जीवावाचून अडत जात
पण अचानकच नियतीचा डाव येतो
या तिसऱ्या गड्याला प्रत्येकजण विसरूनच गेलेला असतो
पण ती पासे फेकणे विसरत नाही, फेकतेच
कधी  पासे आपल्या बाजूने पडतात
आणि खेळ शेवटपर्यंत चालू राहतो
पण कधी पासे तिच्याबाजुने पडतात
आणि खेळ तिथेच संपतो
जाता जाता एक मात्र साक्षात्कार होतो
खेळ खेळासारखाच खेळायचा
अकारण त्यात जीव नाही गुंतवायचा
कारण...
जसा पायात पाय अडकून तोल जातो
तसा जीवात जीव अडकून जीव जायचा
मग मांडलेला तो पसारा
कुणी बर आवरायचा
दुसर कुणी येऊन त्यात नवा खेळ मांडला तर
तो ही खेळ असाच मोडायचा

- जीवनिका





Thursday, February 23, 2012

लाटा आणि भावना
यात काय फरक आहे
सागरात जशा लाटा
एकापाठोपाठ एक येताच असतात
तशा मनाच्या सागरात
भावना येत जातात
कधी हलक्या कधी मोठ्या
एका लाटे पासून दुसरी लाट
वेगळी करता येणार नाही
तसच एका भावनेपासून दुसरी भावना
वेगळी करता येण शक्य नाही
आयुष्याचा मार्ग हा असा एकच मार्ग आहे
ज्यावर चालत असताना माणसाला शेवट नको असतो.
हा मार्ग कधी संपूच नये अस वाटत.
या मार्गावर चालताना माणूस थकत नाही.
या शर्यतीत कधी कोणाला जिंकावस वाटत नाही.

Tuesday, February 21, 2012

मला अज्ञानीच राहू दे
अर्थ नको सांगूस लावायला
अर्थ न लावता
शिकायचय मला जगायला
बेधुंद होऊन चालायला
ठेचकाळले तरी पुन्हा उठायला
आणि वेड्यासारख पुन्हा
त्याच मार्गावरून चालायला
कुणी वेड म्हटलं तरी
त्यावर वेड्यासारख हसायला
पण नको सांगूस मला
त्या वेडेपणामागचा अर्थ मात्र शोधायला

मागे वळून मी पाहणारच आहे .......

पुढे जायचेच आहे
जाणारच आहे
पण तरीही मागे जाऊन
थोडावेळ थांबावे वाटणारच आहे

हरवलेल्या क्षणांची वाळू
हातात घेणारच आहे
भरलेली ओंजळ पुन्हा
रिती होणारच आहे

त्या वाळूचा किल्ला
बांधला जरी तरी
पुन्हा एकदा तो
मोडून पडणारच आहे

येणारी लाट सोबत
तुला नेणारच आहे
तरीही पुन्हा इथेच असशील
असे मला वाटणारच आहे

पाठमोराच तू
राहणार जरी नेहमी
तरीही मागे वळून मी
पाहणारच आहे

-जीवनिका

Monday, February 6, 2012

मना सांग रे ...

मना सांग रे
तुला मी कसे ओळखावे

कधी वाटतो तू वसंतापरी अन्
कधी हा असा सावळा रंगलेला

कधी होतसे मंद झुळूकेपरी तू
कधी का असे तू दिशाहीन वारा

कधी घेतसे झेप प्रकाशाकडे अन्
कधी का असे अंधार तुला भावलेला

मना सांग रे
नेहमी हे असेच का व्हावे
तुझ्यासवे नेहमीच का मी झुलावे
आधी फुलावे अन् मग कोमेजून जावे
मना सांग रे

-जीवनिका

Wednesday, February 1, 2012

स्वप्नांच गाव

का जुन्या स्वप्नांचा हात सोडून
आपण पुढे निघून जातो
आपण पुढे जातो
स्वप्नांचा गाव मागे राहतो
मग कधीतरी आपणच सजवलेल्या
त्य गावात आपण पुन्हा पाय ठेवतो
पण आपलाच तो गाव
आपल्याला परका वाटू लागतो
आपणच सजवलेला तो एक एक खेळ
मग लहानग्यांच्या भातुकलीच्या खेळा इतका
खुळा वाटू लागतो
पण तरीही क्षणभर का होईना
तो खेळ पुन्हा जगवा वाटतो
पण काही केल्या त्या जुन्या खेळात
आता गुंतता येत नाही
पुन्हा जुन्या स्वप्नांत आता हरवता येत नाही
मग वाटत
हीच का ती स्वप्न ज्यात आपण हरवलो होतो
त्याच का त्या स्वप्नासोबत
आपण क्षण अन क्षण जगलो होतो
विश्वास ठेवण तस जरा कठीणच होत
पण याही प्रश्नच उत्तर आपल्याकडेच असत
जुन्या त्या स्वप्नांची जागा
आपल्याच नव्या स्वप्नांनी घेतलेली असते
आणि आपणच नकळत आपल्या
जुन्या सोबत्यांची सोबत सोडलेली असते
म्हणूनच
आपल्याच जुन्या स्वप्नांचा गाव
आपल्यासाठी परका असतो
आणि आपल्याच त्या गावात
आपला मार्ग हरवलेला असतो

-जीवनिका

Saturday, December 17, 2011

स्वप्नांची किमत

स्वप्नांची किमत
कोणी सांगू शकेल का ?
उघड्या डोळ्यांनी पाहिलेली
मनामध्ये सजलेली स्वप्न
जीवापाड जपलेली
पापणीआड दडलेली स्वप्न
भविष्याचा वेध घेणारी
वर्तमान सुंदर करणारी स्वप्न
लहानग्यांच्या भाव विश्वा तली
तारुण्याच्या धुंदितली
उतारवयातल्या समाधानातली स्वप्न
या स्वप्नांची किमत कोणी सांगू शकेल का?
मुळात या स्वप्नांची किमत करता येण शक्य आहे?
मला नाही वाटत
पण तरीही मोजायचीच असेल किमत स्वप्नांची
तर मोजून पहा ते अश्रू त्या डोळ्यांतून वाहणारे
जे डोळे मोडलेल्या स्वप्नांचे तुकडे
पापण्यांआड साठवतात
मोजून पहा ते अश्रू
पहा मोजता येतात का ते
आणि करा स्वप्नांची किमत
कळलीच जर कोणाला स्वप्नांची किमत कधी
तर सांगा मलाही

- जीवनिका

Monday, December 5, 2011

प्रकाशात उजळलेल्या घराकडे पाहिलं जात
प्रकाशाच्या कारणाकडे नाही
कारण प्रकाशाच्या कारणाकडे पहिल्याने
डोळे दिपतात. मानवी डोळ्यांची ते सहन करण्याची क्षमता नाही.
एखाद्या गोष्टीला चांगल्या दृष्टीने पाहिलं
म्हणजे उंची वाढते
त्या गोष्टीचीही आणि आपलीही.

Sunday, December 4, 2011

लहानपणी जेव्हा मुल रडत
तेव्हा त्याला शांत करण्यासाठी आई
त्याच लक्ष इकडे तिकडे वेधते.
मोठेपणीही काहीस तसच असत. आपल्या दुःखावर
फुंकर मारण्याचा प्रयत्न आपली लोक करतात.
खरतर लहानपणी आणि मोठेपणी बऱ्याच गोष्टी, भावना तशाच राहतात
फक्त त्याच स्वरूप बदललेलं असत
बाळबोधपणाकरून शहाणपणाकडे वळलेल असत ...

Saturday, December 3, 2011

स्वप्न प्रत्येकानेच पहावीत
तो अधिकार प्रत्येकालाच आहे
पणप्रत्येक स्वप्न पूर्ण झालच पाहिजे
असा अट्टाहास नको
कारण स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत
पण काही स्वप्न पूर्ण करायची म्हणजे
काहीतरी मोजाव लागत
स्वप्न पाहणार्यालाही आणि
ती पूर्ण करणाऱ्यालाही

Thursday, December 1, 2011

खांदा

माणसाला खांद्याची गरज काय
फक्त हे जग सोडून जातानाच असते?
खरी गरज तर
या जगातले घाव झेलल्यावर असते.
पण हे कुठे कोणाला कळतय
जिवंत माणसाला आधाराला एक खांदा मिळत नाही
आणि मेल्यावर चार चार मिळतात.
हा कुठला न्याय? हि कुठली रीत?

Monday, November 21, 2011

डाव

मुखवटा कुणीच ओढला नव्हता
पडदा तुझ्याच डोळ्यांवर होता
साद कुणीच घातली नव्हती
आवाज तुझ्याच मनाचा होता
वाट कुणीच दाखवली नव्हती
पाठलाग तूच केला होतास
डाव कुणीच मांडला नव्हता
मांडलेला डाव फक्त तुझाच होता
म्हणून
मोडला जरी डाव तरी
दोष कुणाला देऊ नकोस
पण पुन्हा नवा डाव मांडण्याची
तसदी मात्र घेऊ नकोस
पण सवयीचा गुलाम तू
मांडणारच डाव नवा
तेव्हा एक मात्र कर
नवा सवंगडी मात्र मागू नकोस

-जीवनिका

Sunday, November 6, 2011

तळ्यातल पाणी

तळ्यातल पाणी
त्याला झऱ्यासारख वाहण कुठे माहितीये?
सारख आकाशाकडे डोळे लावून बसत
त्याला जगाकडे पाहण कुठे माहितीये?

कधीतरी पाऊस येणार
थोड वाहायला शिकवून जाणार
याची ते वाट पाहत राहत
पण वाहायचंय वाहायचंय म्हणताना
त्याच वाहायच राहूनच जात
वाट पाहता पाहता आटण मात्र होत

मग नेमेची पावसाळा येतो
थोड वाहण देऊन जातो
पुन्हा तो गेल्यावर त्याच वाहण थांबत
पुन्हा डोळे लावून वाट पाहण होत
कारण वाहण म्हणजे नक्की काय
हे त्याला माहीतच कुठे असत?

काहींच जगण सुद्धा असंच असत
कुणीतरी येणार
जगण शिकवून जाणार
कुणीतरी येतही
जगण देऊन जातही
गेल्यावर पुन्हा वाट पाहणंही होत

पण खर जगण कसं होणार
कारण जगण म्हणजे काय
हे त्यांना माहित कुठे असत?

-जीवनिका

Friday, November 4, 2011

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

सापडलेला हीरा कि नुसता चकाकणारा दगड

ते नाही मला पाहायचंय

त्याच्या त्या चकाकण्याने

मला दिपून जायचंय

सत्य आणि भ्रम यातलं

अंतर पुसून टाकायचंय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

थोड रेंगाळत चालत जायचंय

माझीच पावल मोजत जायचंय

त्यातसुद्धा मला थोड चुकायचंय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

-जीवनिका

Thursday, November 3, 2011

चेहरा

जगात प्रत्येक जण रंग भूमीवरच पात्र रंगवत असतो
पण त्या पलीकडला खरा माणूस कुठे दिसतो?
तो चेहरा नेहमी लपलेला असतो
जो समाजाच्या चौकटींत बसतो
तोच मुखवटा प्रत्येकजण ओढतो
कालांतराने मुखवटा बदलतो
पण खरा चेहरा लपूनच राहतो
पण कधीतरी एखादा क्षण येतो
आणि चेहरा उघडा पडतो
दोन मुखवट्यांच्या अदलाबदलीच्या
दरम्यान घात होतो
काही काळापुरताच का होईना
खरा चेहरा समोर येतो
पण समोरचा त्यावेळी
पाहणारा असावा लागतो
पण दैव दुर्विलास असा
कि समोरचा आपल्या मुखवट्यांच्या
अदलाबदलीच्या खेळत अडकलेला असतो
कारण त्यालादेखील आपला खेळ चांगला रंगवायचा असतो
म्हणून तो खरा चेहरा पाहण्याची संधी मुकतो
आणि खरा चेहरा नेहमी पडद्याआडच राहतो

-जीवनिका

ती/तो

ती/तो

प्रत्येकाच्या मनातला ती किंवा तो
त्याला काही नाव नको देऊया
त्याला कोणता चेहरा नको लावूया
राहू दे त्याला तसाच
अनोळखी तरीही ओळखीचा वाटणारा
आहे कुठेतरी तो या जगात
राहू दे मला या भ्रमात
तो सापडण्याआधी, त्याला शोधण होऊ दे
मोहराण्याआधी, माझ झुरण होऊ दे
त्याची वाट पाहण, माझ जगण होऊ दे
त्याच्या दिसण्याआधी, त्याच असण होऊ दे
त्याच्या सत्याआधी, त्याच स्वप्न पाहू दे
कुणीतरी तो, त्याला तसाच राहू दे

-जीवनिका



Tuesday, November 1, 2011

भ्रम

नको ना तो भ्रम मोडूस

नको ना ते चित्र खोडूस

राहू दे ते तसच

पडून राहील वर्षानुवर्ष

काळासोबत जीर्ण होईल

आणि त्याच पर्ण होईल

जाळीदार होईल काही काळानंतर

आणि त्यासोबतच ते वाहून जाईल

पण खोडल जाणार नाही कधीच

तुही नकोच खोडूस ते आज

राहू दे तो भ्रम तसाच

-जीवनिका




का रे मना

का रे मना

असा वेड्यासारखा धावतोस

धडपडलास तर तुला

कोण सावरणार आहे

एकटाच धावतो

आहेस या वाटेवर

मग शेवट कसा

इथे ठरणार आहे

म्हणून जिंकलास जरी

आज तू तरीही

पहा कुठे कोण

हरणार आहे

-जीवनिका


Monday, October 31, 2011

उद्या मी नसले तर ...

उद्या मी नसले तर ...

अगदीच काही हुंदका दाटणार नाही गळ्यात

अगदीच काही पाणी साठणार नाही डोळ्यात

पण चालता चालता काही पावलं मात्र थबकतील

चार दोन आठवणी डोळ्यांपुढे तरळतील

खोलवर कुठेतरी हलेल काहीतरी खास

क्षणभरच इथेच का ती असा मात्र होईल भास

पण पुढच्याच क्षणी काही उसासे सुटतील

आठवणीही त्यातून मोकळ्या होतील

भावनांची धारही मग बोथट होईल

आणि आठवेल अशा वेळी काही बोलायचे असते

पण जाणाऱ्याला वाईट म्हणण्याचा प्रघात नाही आपल्याकडे

म्हणून जाता जाता 'चांगली होती' एवढेच फक्त म्हणून जातील

-जीवनिका

(आपण नेहमी काहीतरी अपघाताच्या बातम्या वाचतो. कुणीतरी गेल्याच्या बातम्या पाहतो, वाचतो. अशा वेळी नेहमी माझ्या मनात येत, आपण समजू शकतो कि गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कसे वाटत असेल. त्याच्या जवळच्या व्यक्तींना कसे वाटत असेल. पण हे झाल जवळच्या माणसंच वर्तुळ. त्या वर्तुळाच्या परीघाबाहेरील व्यक्तींचे पण दोन प्रकार पडतात. एक म्हणजे ते जे त्या व्यक्तीला अजिबात ओळखत नाहीत. त्यांना त्या घटनेबद्दल काहीही वाटणार नाही. ते त्रयस्थाच्या नजरेने त्याकडे पाहतील.

आता उरलेला भाग. असे लोक जे जाणाऱ्या व्यक्तीला फार थोडे ओळखतात. जवळीक नाही पण तोंडओळख आहे. अशा लोकांची साधारण प्रतिक्रिया कशी असेल याबद्दल मला उत्सुकता होती. हि कविता साधारणपणे याच लोकांची प्रतिक्रिया मांडते आहे.)

दीपज्योती २०११

क्षण आणि आठवणी

क्षणांच्या आठवणी होतात आणि क्षण परके होतात
पण आठवणी कधीच परक्या होत नाहीत
क्षण जाताना आयुष्य घेऊन जातात
पण आठवणी जगताना नेहमी सोबत करतात
पण कधी कधी आठवणी सुद्धा त्रास देतात
जसे जुन्या जखमांचे व्रण नव्याने जखमा देतात
पण त्यावर फुंकर घालायला पुन्हा आठवणीच येतात
आठवणी आणि क्षण वेगळे नसतात
कारण क्षणांच्याच नंतर आठवणी होतात
म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण असा सांभाळावा
कि त्या क्षणांच्या चांगल्या आठवणी होतील
आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला नवा रंग देऊन जातील

http://deepjyoti2011.blogspot.com/2011/09/blog-post_8236.html

कागदी फुलंच ते ...

कागदी फुलंच ते ...

कागदी फुलंच ते, त्याला ना मधू ना गंध

म्हणून ...

फुलपाखरू इंद्रधनुषी रंग त्यावर कधीच नाही रचणार

रेशमी केसांवर ते कधीच नाही सजणार

देवाच्या पायी नतमस्तक होण्याचा मान त्याला कधीच नाही मिळणार

ते तसच पडून राहणार...

त्याच्या डोळ्यांदेखत खऱ्या फुलांचे निर्माल्य होणार

आणि त्याच्या मनात एक शल्य कायम सलणार

पण,

कागदी का असेना फुलंच ते

कोमेजल नाही तरी चुरगळणारच कधी ना कधी

कारण या नश्वर जगात सौंदर्य कुठवर शाश्वत होऊन टिकणार

http://deepjyoti2011.blogspot.com/2011/09/blog-post_8236.html

Friday, August 26, 2011

आयुष्य अगदी ....

मला वाटतं,
आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.
जगात पहिल्यांदा डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडत जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात
आयुष्य सरत असतं...
काही पानं दुमडली जातात, परत कधीही उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात...
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलं असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं

- जीवनिका .

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे

श्रावणात असलेला उन पावसाचा खेळ

आणि आकाशी वसलेला इंद्रधनुषी मेळ

दोन जिवांतील अनामिक ओढ

प्रसंगी तुरट पण तरीही अवीट गोड

डगमगत्या पावलांना जशी धीराची साथ

आणि कधीही घातलेली हक्काची साद

जसा मायेने भारावलेला घासभर भात

आणि हलकेच पाठीवर ठेवलेला हात

अशीच राहुदे मैत्री जन्मभर

जसा वणवणता प्रवास आणि विश्रांती क्षणभर