कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Thursday, December 1, 2011

खांदा

माणसाला खांद्याची गरज काय
फक्त हे जग सोडून जातानाच असते?
खरी गरज तर
या जगातले घाव झेलल्यावर असते.
पण हे कुठे कोणाला कळतय
जिवंत माणसाला आधाराला एक खांदा मिळत नाही
आणि मेल्यावर चार चार मिळतात.
हा कुठला न्याय? हि कुठली रीत?

2 comments: