कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Wednesday, February 1, 2012

स्वप्नांच गाव

का जुन्या स्वप्नांचा हात सोडून
आपण पुढे निघून जातो
आपण पुढे जातो
स्वप्नांचा गाव मागे राहतो
मग कधीतरी आपणच सजवलेल्या
त्य गावात आपण पुन्हा पाय ठेवतो
पण आपलाच तो गाव
आपल्याला परका वाटू लागतो
आपणच सजवलेला तो एक एक खेळ
मग लहानग्यांच्या भातुकलीच्या खेळा इतका
खुळा वाटू लागतो
पण तरीही क्षणभर का होईना
तो खेळ पुन्हा जगवा वाटतो
पण काही केल्या त्या जुन्या खेळात
आता गुंतता येत नाही
पुन्हा जुन्या स्वप्नांत आता हरवता येत नाही
मग वाटत
हीच का ती स्वप्न ज्यात आपण हरवलो होतो
त्याच का त्या स्वप्नासोबत
आपण क्षण अन क्षण जगलो होतो
विश्वास ठेवण तस जरा कठीणच होत
पण याही प्रश्नच उत्तर आपल्याकडेच असत
जुन्या त्या स्वप्नांची जागा
आपल्याच नव्या स्वप्नांनी घेतलेली असते
आणि आपणच नकळत आपल्या
जुन्या सोबत्यांची सोबत सोडलेली असते
म्हणूनच
आपल्याच जुन्या स्वप्नांचा गाव
आपल्यासाठी परका असतो
आणि आपल्याच त्या गावात
आपला मार्ग हरवलेला असतो

-जीवनिका

No comments:

Post a Comment