कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Sunday, September 9, 2012

व्यर्थच

जगण्याचा अर्थ शोधता, मरणाचे ते भय ठरले
मरणाचा अर्थ उमगता, जगणे ते व्यर्थच ठरले

नसण्यासम असणे होते, क्षणभर ते जगणे होते
जगण्याचा अर्थ हरवता, असणे ते व्यर्थच ठरले

काळासव घडले काही, जगण्यातून कळले काही
पण सारे अर्थ हरवले, कळणे ते व्यर्थच ठरले

- जीवा

गझल  लिहिण्याचा प्रयत्न केला होता पण जमला नाही.

No comments:

Post a Comment