कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Saturday, August 13, 2011

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

येणाऱ्या प्रत्येक जीवाला

हातच्या खेळण्या सारख खेळवते

सर्व दोर हाती धरून

कठपुतली सारख नाचवते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?


चेहऱ्यावरच हसू

किती कठोरतेने पुसते

डोळ्यातलं पाणी पाहून

निर्दयतेने हसते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?


गेल्याजन्मीच्या पाप पुण्याचे हिशेब

या जन्मी मांडते

आणि खरोखरीच निष्पाप जीवांवर

जीवघेणे आघात करते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?


दोन क्षणात

होत्याच नव्हत करते

पाहता पाहता

उभ्या जीवनच मातेर करते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?


पण हळूच कधी कधी

ओंजळी भर भरून सुख देते

दुखालेल्या जीवाला

मायेची उब देते

खरच ही नियती इतकी का निष्टुर असते ?

No comments:

Post a Comment