कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Friday, August 26, 2011

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे

श्रावणात असलेला उन पावसाचा खेळ

आणि आकाशी वसलेला इंद्रधनुषी मेळ

दोन जिवांतील अनामिक ओढ

प्रसंगी तुरट पण तरीही अवीट गोड

डगमगत्या पावलांना जशी धीराची साथ

आणि कधीही घातलेली हक्काची साद

जसा मायेने भारावलेला घासभर भात

आणि हलकेच पाठीवर ठेवलेला हात

अशीच राहुदे मैत्री जन्मभर

जसा वणवणता प्रवास आणि विश्रांती क्षणभर

No comments:

Post a Comment