नुसत्या विसर म्हटल्याने विसरता येतात काही गोष्टी?
आयुष्याच्या काळ्या पाटीवर पांढर्या खडूने बरच काही लिहील जातं. कधी
कधी पाटी पुसायची वेळ येते तेव्हा लिहिलेलं पुसताही येत, अगदीच नाही जमल तर ओल्या
कापडाने पुसायच.
पण काही गोष्टी पाटीवर अगदी ओरखड्यासारख्या उमटून गेल्या असतील तर? तो
‘ओरखडा’ कसा पुसायचा?
पाटी काळी होते पुन्हा पण नवी कोरी होत नाही
आयुष्याची गोष्ट आता
तुझ्याशिवाय पुरी होत नाही
No comments:
Post a Comment